'टेलिपथी' - एक अलौकीक अतिंद्रिय शक्ति-लेखांक २

 


जेंव्हा भाषा नव्हती, शब्दच नव्हते तेव्हा मनुष्यप्राणी कसे संवाद साधायचा? कसा आपल्या भावना, आपले विचार दुस-यांना सांगायचा? अति प्राचीन काळात मानव इतर प्राण्यां प्रमाणेच आपल्या मनातील विचार दुस-या मानवा पर्यंत पोहोचवत असेल. जसे प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ, सिग्मंड फ्रॉईड यांनी व्यक्त केलेल्या मता प्रमाणे, कीटक व मुंग्या आपल्या सामूहिक इच्छाशक्तीने टेलिपथी द्वारे आपले कार्य करीत असावे. तसेच प्राचीन काळी कदाचित मानव सुद्धा आपल्या समूहात ही टेलिपथी एकमेकांचा विचार जाणून घेण्यासाठी वापरत असेल. चेह-याचे हावभाव, दृष्टिक्षेप हे तेंव्हा उपयोगात येत असतील जेंव्हा व्यक्ती एकमेकांच्या सानिध्यात असतील पण दूरवरच्या व्यक्तींशी विचारांचे दळणवळण टेलिपथीद्वारे होत असावे.

काळाप्रमाणे मनुष्याची उत्क्रांती होताना मेंदू प्रगत होताना, भाषेचा विकास होताना, मानवाने संप्रेक्षणाच्या नवनवीन पद्धती अवलंबल्या व टेलिपथीची प्रक्रिया, म्हणजे मनाने मनाच्या तारा जोडण्याची’ प्रक्रिया मागे पडली. त्याची जागा टेलिफोनच्या तारांनी घेतली आणि आता तर वायरलेस कम्युनिकेशन- मोबाईलचा वापर होत आहे.  पूर्वी पत्रे लिहिली जायची तेव्हा लिखाणाचा सराव सर्वांना होता. आता ई-मेल, एसएमएस, आणि व्हाट्सअपचा वापर करताना आपण हाताने लिहिणे विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीत किती दूर गेली टेलीपथी आपल्या जीवनातून! याचा र्थ जी अतिंद्रिय शक्ती, अति प्राचीन मनुष्यात सरसकट प्रकर्षाने अस्तित्वात होती, ती आता काही निवडक व्यक्तीं मध्ये नैसर्गिक रित्या अस्तित्वात आहे व काही मोजक्या जणांनाच ती ध्यान धारणेच्या साधनेतून उर्जित करता येते. अर्थात आजच्या भाषेत बोलायचं तर ऍक्टिव्ह’ करता येते पण याचा अर्थ असा नाही, की ही शक्ती सर्वसाधारण व्यक्तींमध्ये नसतेच फक्त तिची जाणीव नसते. दैनंदिन जीवनात कित्येक व्यक्तींना टेलिपथीचे अस्तित्व जाणवते पण ती टेलिपथी’ आहे हे मात्र माहीत नसते. हा अनुभव म्हणजे ‘टेलिपथी’ हे ज्ञान नसते. उदाहरणच पहा ना कित्येक वेळा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढतो आणि काही वेळात ती व्यक्तीच आपल्या समोर येते. काही वेळेस बोलता-बोलता दोन व्यक्ती एकच विचार प्रकट करतात तेव्हा आपल्या आणि दुस-या व्यक्तीला असे लक्षात येते की आपण एकाच वेळी एकच विचार केला होता. -याचदा आपल्या मनात विचार येतो की फोन वाजला” आणि आपण फोनकडे पाहतो तोवर फोनची रिंग वाजते. जेंव्हा एखादी व्यक्ती, आपल्या जवळची, नात्यातली आपल्या पासून दूर असते. आजारी किंवा संकटात असते तेंव्हा आपल्याला सारखी त्या व्यक्तीची आठवण येते मनाला हुहूर लागते आणि न राहून आपण त्या व्यक्तीला फोन करतो किंवा काही दिवसांनी आपल्याला समजते कि ती व्यक्ती तिच्या आजारपणात किंवा संकटात आपलीआठवण काढीत होती. असेच स्वप्नांच्या बाबतही होते. काही लोकांचे अनुभव आहेत की एका वेळी दोन व्यक्तींना सारखेच स्वप्न पडते किंवा स्वप्नातच कोणी वयस्कर व्यक्ती अथवा आपले गुरु आपल्या मनातील एखाद्या शंकेचे उत्तर देतात व निरसन करतात

हे सर्व अनुभव केवळ योगायोग नाहीत. अभ्यासकांच्या मते जेंव्हा आपले आंतरिक मन जागृत होते, मग ते स्वप्नात असो, एकांतात असो किंवा गर्दीत असो अभावितपणे एखाद्या क्षणासाठी ते आपले लक्ष वेधून घेते. गर्दीत जेंव्हा दुरवर एखादी ओळखीची व्यक्ति दिसते, हाक मारूनही आपला आवाज त्या व्यक्ति पर्यंत पोहोचणे शक्य नसते अशा वेळी आपल्या मनात येते की त्या व्यक्तीने वळून आपल्याकडे पहावे आणि अगदी तसेच होते आपले मन दुस-या व्यक्तिच्या अंतर्मनाशी जोडले जाते. ती व्यक्ती आपल्याकडे पाहते. आजकालच्या भाषेत सांगायचे तर एक जागृत मन दुसऱ्या जागरूक मनाची फ्रिक्वेन्सी त्यावेळेस पकडते, जसे रेडिओची फ्रिक्वेन्सी असते अगदी त्याप्रमाणेच पण अशा घटना अनेकदा अचानक घडतात व त्यामुळे त्यांच्या नोंदी ठेवणे किंवा पुन्हा पुन्हा जसेच्या तसे ते अनुभव सत्यात उतरवणे हे शक्य होत नाही म्हणून शास्त्रीय पद्धतीने या अनुभवांचा अभ्यास करता येणे कठीण होते. अनेक वर्षां पासुन भारतात तसे विदेशातही मानसशास्त्रज्ञ टेलिपथी संबंधी संशोधन करीत आहेत. मुळात या संशोधनाची सुरूवात इथ पासून होती की टेलिपथी ही भौतीक प्रक्रियेतून उत्पन्न होते की मानसिक प्रक्रिया आहे, की त्याही पलीकडे जाऊन परामानसशास्त्रीय घटना आहे.

(क्रमशः)

लेखिका – रेखा छत्रे रहाळकर                                              
  ज्योतिष विशारदभविष्य भूषणहस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ

                       


किमया ग्रह गोचरीची आणि महादशांची

 

विधिलिखित, विधिलिखित म्हणतात ते हेच

जे ब-याचदा बदलता येत नाही आणि जाणकार ज्योतिषी नसेल तर समजतही नाही- काय घडेल, काय घडू शकते, काय बदलता येऊ शकेल, काय प्रयत्न केले म्हणजे यश मिळेल, हे तुम्हाला ज्योतिषीच सांगू शकतो कधी तुमचा हात पाहून, कधी तुमचे ग्रह पाहून, तर कधी तुमच्या जन्म तारखेचे अंक पाहून. या पूर्वीच्या एका लेखात आम्ही अक्षरांची किमया व पंतप्रधानांची नावे दिली होती. जर खरोखरच राजकीय प्रवासासाठी ज्योतिषाकडून मार्गातील अडथळे समजून घेतले तर निश्चितच मुक्कामाचे ठिकाणी पोहोचणे सोपे जाईल, निश्चित होईल. २०२२-२३ या काळात कधीतरी आम्ही भविष्य वर्तवले होते की २८ नोव्हेंबर २०२३ किंवा उशिरात उशिरा १० डिसेंबर २०२३ याचे आत लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपा  पक्ष परत सत्तेत येण्याची शक्यता ७०% आहे तर १० डिसेंबर २०२३ नंतर मे २४ पर्यंत केंव्हाही निवडणूक झाली तरी भाजपा सरकार अर्थात पर्यायने मा. श्री. मोदी सत्तेत येण्याची शक्यता ३०% आहे. ही टक्के वारी देताना आम्ही भारताची रास मकर आणि पंतप्रधानांची रास वृश्चिक याचा जरूर विचार केला होता.

मकर राशीला साडेसाती चालू असून, शेवटचे अडीचके चालू आहे त्यातच २७ ऑक्टोबर २०२३ रोजी काही प्रतिकूल ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करीत होते. व्यक्तिशः मा. श्री. मोदींच्या कुंडलीत लग्न व चंद्र रास एकच असल्याने हे ग्रह प्रतिकूल होत होते. त्या आधारावरच आम्ही वरील भाकीत केले होते.

महाराष्ट्राची रास धनु आहे. २०१४ मध्ये धनु राशीला लागलेली साडेसाती १७ जानेवारी २०२३ रोजी संपल्या नंतर सुद्धा, त्याचे काही परिणाम महाराष्ट्रावर होतच राहीले. पण शनी महाराजांची कृपा की साडेसातीचा शेवट होता, होता महाराष्ट्राला काही चांगले दान पदरात टाकून ही साडेसाती गेली ती कशी ते पाहू.

जरी का शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन राजकीय पक्ष फुटले तरी महाराष्ट्रात परिवर्तन घडले ते या निवडणुकीत आणि ग्रह जे येतात ते परिवर्तनच करायला येतात. मग महादशा असो अंतर्दशा किंवा साडेसाती. वाईटातून चांगले किंवा चांगल्यातून वाईटाकडे परिवर्तन ग्रहांच्या भ्रमणामुळेच होत असते. तेच नेमके परिवर्तन आता मकर राशीत म्हणजेच भारताच्या राशीत, अर्थात केंद्रीय सत्तेत झालेले दिसत आहे. एक पक्षीय सत्ता स्वअधिकारात जे काही चांगल्यात चांगले करते किंवा वाईटात वाईट करते, ते या मकर राशीच्या साडेसातीत भारतीय जनतेने चांगले ही अनुभवले व वाईट ही सोसले. मकर राशीची साडेसाती संपत आली आहे आणि शनी महाराज नक्कीच खूप काही चांगले भारतीय जनतेला देऊन जाणार आहेत. त्याची ही सुरुवात तर नाही?!

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे वेळी त्रिशंकू सरकार येईल असे भाकीत आम्ही केले होते आणि ते शब्दशः सत्यात उतरले हे आपण पाहिलेच आहे. आता, अगदी नुकतेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही अंक ज्योतिषाच्या आधारे काही अंदाज व्यक्त केले. महाराष्ट्राच्या बाबतीत ९०% अंदाज खरे ही झाले आहेत. अनेकांनी आम्हाला विचारले होते की मोदी पंतप्रधान होतील का? त्या वेळीही आम्ही हेच उत्तर दिले होते, की मोदी पंतप्रधान होणार नाहीत पण सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष म्हणून भाजप हा पक्ष सत्तेत येऊ शकतो पण इतर पक्षांच्या मदतीनेच आणि तरीही मा. श्री. मोदी स्वत: पंतप्रधान न होता कोणाचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवतील आणि तसे घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मा. श्री. मोदींना मंगळाची महादशा सुरू आहे. लग्न व चंद्र कुंडली एकच असल्याने लग्न व चंद्र राशीचा स्वामी मंगळ हा अधिक कठोरपणे त्यांच्याकडे बघणार आहे. आम्ही ज्योतिषी नेहमीच एक उदाहरण देतो की, बाप जसा मुलाचे खूप लाड करतो तसा तो मुलाला फार कडक शिक्षाही करतो. आताही नेमके तेच झाले आहे. एकीकडे बहुमताचा आंकडा पार न करता ही सत्तेची संधी चालून आली आहे आणि दुसरीकडे पंतप्रधान पद हिरावून घेतले जाणार आहे- ही सत्वपरीक्षा आहे. बघूयात मा. श्री. मोदी या सत्व परीक्षेत यशस्वी होतात का?

इतर पक्षांचेही ग्रह पाहता नितीश कुमार (जे डी यु) चंद्राबाबू (टी डी पी)  यांच्या जोडीला काल-परवाच स्वतःच्या पक्षातून वेगळी चूल मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथजी शिंदे यांचे ग्रह खूपच प्रभाव टाकत आहेत. शिंदे यांचे उदाहरण घेतले तर ग्रहही कसे छप्पर फाडके देते हैं हे निश्चित पटेल कारण अवघ्या दोन वर्षात मुख्यमंत्रीपद व आता केंद्रात स्वतःचे सात खासदार घेऊन एकनाथ शिंदे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत.

...आणि 'इंडी' आघाडी (I.N.D.I. Alliance) बद्दल बोलायचे झालेच तर या घडीला-  लग्न कुंडली, ग्रह गोचर, महादशा या तिन्हीच्या आधारे पंतप्रधान पदाचे तीन उमेद्वार 'इंडी' आघाडी कडे आहेत.

मा. श्री शरद पवार, मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे व मा श्री राहुल गांधी!

या तिघांच्या पत्रिका पुढील प्रमाणे-


 
                                           (मा. श्री शरद पवार)                                         (मा. श्री मल्लिकार्जुन खर्गे)


(मा श्री राहुल गांधी)


लेखिका – रेखा छत्रे रहाळकर

ज्योतिष विशारद, भविष्य भूषण, हस्तरेषा व चेहरावाचन तज्ञ


सीमोलंघन करावेच लागेल!

दसरा झाला ! दसरा का व कसा साजरा करतात या विषयी अनेक पुराण कथा आपल्याला माहित आहेत, ज्यांना  या पूर्वी माहित नसतील त्यांनी या वर्षी ऐकल्या अस...