वडवानल स्तोत्र उपासना म्हणून म्हणताना- पध्दत, कारण, जपाची संख्या, मुदत पुढील प्रमाणे-
*महत्वाचे- वय साठीचे पुढे असेल तर १ किंवा ३ वेळाच म्हणा पण नियमित म्हणा.
पध्दत-
१) उजव्या हातात जी शक्य असेल ती दक्षिणा रूपये 1/- ते 11/- फक्त नाणी स्वरूपात घेवून, नेमकी कुठली समस्या आहे त्याचा उच्चार करावा.
- समस्या
उच्चरणे- उदाहरण-
- “मला नोकरी मिळू दे”, “मला सरकारी नोकरी मिळू दे”, “मला अमूक अमूक व्हिसा मिळू दे” ( ज्या देशाचा व ज्या काळासाठी व्हिसा मागितला आहे तो उच्चारणे),
- कोर्टकेस
बाबत तसेच प्रतिपक्षाचा उल्लेख करून “अमूक अमूक केस मी जिंकू दे” मी नियमित – वेळा स्तोत्र म्हणेन “ असा संकल्प करून ताम्हनात हातातील दक्षिणेसह घेतलेले पाणी सोडणे.
२) नंतर ही दक्षिणा ब्राह्मणास देणे किंवा मारूतिचे देवळात नेवून ठेवणे.
कारण, जपाची संख्या, मुदत -
(१) कुठल्याही नोकरीसाठी, रोज सकाळी व रोज सायंकाळी एक वेळ म्हणणे किमान सहा महिने.
(२) सरकारी नोकरीसाठी ५/ ७/ ११ वेळा झेपेल त्यानुसार रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणावे. किमान ६ महिने.
(३) परदेशगमन, व्हिसा, ग्रीनकार्ड, परमनंट व्हिसा यासाठी पत्रिका दाखवून विचारावे. ब-याच वेळा या उपासनेचि गरज भासतेच असे नाही, पण प्रश्न फारच अडकून पडला असेल किंवा काही गंभीर प्रॉब्लेम निर्माण झाला असेल तर अधिक उपायही सांगता येतात. एरवी 3 किंवा ९ वेळा म्हणावे.
(४) कोर्टकेस कुठलिही सिव्हिल केस असेल तर १, ३, ५ वेळा म्हणावे रात्री व केस संपेपर्यंत.
*सिव्हील पण घर, वास्तू, वडिलोपार्जित इस्टेट संदर्भात केस असेल तर ७ ,९, ११ वेळा.
** केस फौजदारी स्वरूपाचि असेल तर सूर्योदयाचे सुमारास एक वेळ, दुपारी १२ ते २ या वेळात तीन वेळा व रात्री झोपण्यापूर्वी ७ वेळा असे दिवसातून ११ वेळा म्हणावे यश येईपर्यंत.
याशिवाय नोकरी निमित्त देशात परदेशात दौरे/ टूर करणा -यांनी, कुठल्याही कारणाने सतत प्रवास करावा लागतो त्यांनी, परदेशात रहाणा-या लोकांनी सुरक्षेचे दृष्टीने. ‘सुरक्षाकवच’ म्हणून या स्तोत्राची उपासना करावी. हनुमान हा वायुपूत्र आहे, मनाचे वेगाने भक्त रक्षणासाठी तो धांवत येतो. काही वेळेस तर “वार्ताही नुरे दु:खाचि” तद्वत येवू घातलेले संकट आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच परतून लावले जाते. ‘मिरॅकल’ आहे, पण असे घडते हा लोकांचा अनुभव आहे.